97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्वतंत्र मजूर पक्ष : विस्मृतीत गेलेला इतिहास


महाडचं आंदोलन हा सर्वसाधारणपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीचा आरंभबिंदू मानता येतो. बहिष्कृतांची परिषद म्हणून सुरुवात झालेली ही घटना अखेरीस स्थानिक चवदार तळ्यावरील मोर्चामध्ये रूपांतरित झाली. तळ्याचं पाणी वापरण्याचा हक्क कायद्यानं दलितांना आधीच दिलेला होता. प्रांतीय विधिमंडळ आणि महाड महानगरपालिकनेही हा कायदा अमलात आणला होता. त्यानुसार आपला हक्क बजावण्यासाठी हा मोर्चा तळ्याकडं निघाला. परंतु तरीही मोर्चात सहभागी झालेल्यांनी तळं अशुद्ध केल्याचं सांगत सवर्ण हिंदूंनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या प्रसंगानं बाबासाहेबांना चीड आली आणि नऊ महिन्यांनी महाडमध्येच सत्याग्रह परिषदेचं आयोजन करायचं त्यांनी जाणीवपूर्वक ठरवलं. पण चवदार तळं हे मुळातलं ‘चौधरी तळं’ आहे, म्हणजेच खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळं त्यावर बाकीच्यांना विनापरवानगी प्रवेशाची मुभा नाही, असा बनाव रचून सवर्ण हिंदूंनी न्यायालयाकडून बंदी आदेश मिळवला. त्यानंतर दहा वर्षांनी न्यायालयानं दलितांच्या बाजूनं निकाल दिल्यावर हे प्रकरण मिटलं, पण हा विजय प्रचंड हानीनंतर मिळालेला होता. महाडमधील अपयशानं बाबासाहेबांना पूर्णपणे निराश केलं. अस्पृश्यांच्या आंदोलनानं सवर्ण हिंदूंना आपल्या समाजातील रचनात्मक अन्यायाची जाणीव होईल आणि त्यांच्यातील पुढारलेले घटक अस्पृश्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी सुधारणांना सुरुवात करतील, अशी आशा बाबासाहेबांना आधी होती.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe