97632 06212 pwatsaru@yahoo.com

काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तान : भूमिका आणि चिंता


8 जुलै 2016 रोजी काश्मीरमधील अनंतनाग या भागात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा काश्मिरी कमांडर बुरहान मुजफ्फर वानी भारतीय सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेल्यामुळे काश्मीरमध्ये उसळलेला हिंसाचार आजही टिकून आहे. जवळपास 40 नागरिक मृत्युमुखी तर 3100 पेक्षा जास्त नागरिक या हिंसाचारात जखमी झालेले आहे. काश्मीरमधील आजची परिस्थिती अतिशय बिकट अवस्थेत असून भारताच्या सत्ताधारी व विरोधी पक्षानेही हे मान्य केले आहे. 18 जुलै 2016 च्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्यावर बरीच चर्चा झाली आणि या समस्येची गंभीरता आणि उपाय यावर शासनस्तरावर पुढे मोठी पावले उचलण्याचे धोरण आखले जात आहे. काश्मीर घाटीमध्ये हिंसाचार हा भारतीयांसाठी नवीन नाही. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा प्रश्न आजही त्याच अवस्थेत आहे. काश्मीर प्रश्नावर सीमेपलीकडून वारंवार होणारे हस्तक्षेप व राजकारण हे काश्मीर प्रश्नास वाढविण्यासाठी नेहमी कारणीभूत ठरले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe