97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठावादास मराठेतर बहुजनांचा प्रतिवाद


13 जुलै कोपर्डीच्या घटनेत मराठा समाजाच्या मुलीचा बळी गेल्याने मराठा समाजाची विशेषत: मुले, मुली व महिला यांच्या लाखोंच्या सहभागाने शांत व शिस्तबद्ध मोर्चे निघाले. निंदनीय घटनेचा निषेध नोंदवणे स्वाभाविक आहे. हे मोर्चे महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सातत्याने आणि सर्वत्र निघाले त्यात मोर्चेकर्यांच्या विविध मागण्यांचे फलक होते : अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करून अटकपूर्व जामीन दिला जावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजास आरक्षण द्यावे, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, मराठा समाजाच्या विद्यार्थी व युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 2017 अखेरपर्यंत पूर्ण करावे, उच्च व परदेशी शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ताराबाई शिंदे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने फेलोशिप मिळावी.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe