97632 06212 pwatsaru@yahoo.com

पहिले ते अर्थकारण


सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे त्यांच्या प्रमुख तीन मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राहिलेल्या जिल्ह्यांतून आणखी निघणार आहेत व शेवटी 15 ऑक्टोबरला मुंबईत असाच मोठा मोचार्र् काढून पुढील तालुकावार मोर्चे अथवा रस्ता रोको इत्यादीसारखे कार्यक्रम घेणार होते. कोपर्डी घटनेच्या निमित्ताने होत असलेले हे मोर्चे देशभर आरक्षणाच्या मागणीसाठी यासारख्याच जाट, गुर्जर, पाटीदार इत्यादी समाजाच्या आंदोलनाच्या मानाने शांततेने, संयमाने व कोणतीही वित्तहानी न होता निघत आहेत, हे या मोर्चाचे वैशिष्ट्यच म्हणायला पाहिजे. या मोर्चापूर्वीचेही गावपातळीवरील या समाजाचे आंदोलन हे तसेच शांततेने झाालेले आहे, याचीही नोंद घ्यायला पाहिजे. आताचे हे मोर्चे उत्स्फूर्तपणे निघत आहेत असे म्हटले जाते पण ते तसे नसून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे म्हणायला पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe