97632 06212 pwatsaru@yahoo.com

पर्यावरणीय स्त्रीवादाची कविता


भारतात पर्यावरण संरक्षण चळवळ साधारणत; १९७३ च्या सुमारास सुरू झाली. चिपको आंदोलन हा या चळवळीचा प्रारंभबिंदू. या चळवळीत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. चळवळीत एकत्र कामकरताना स्त्रियांच्या लक्षात आले, की बर्‍याच मुद्द्यांबाबत त्यांच्यात आणि पुरुषांमध्ये मतभिन्नता आहे. विशेषतः नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा करावा याविषयी पुरुष व स्त्रियांची मते खूप वेगळी असल्याचे जाणवायला लागले. या वेगळेपणातूनच मग स्त्रियांनी आपली वेगळी मोट बांधली. अभ्यासांती स्त्रियांना त्यांचे निसर्गाशी असलेले नाते आणि एकूणच निसर्गाचा मानवी जीवनाशी असलेला सहबंध यांची उकल होऊ लागली. या सर्व घटकांचा, क्रिया-प्रक्रियांचा, अध्ययन, अनुभवांचा परिपाक म्हणून भारतीय पर्यावरणीय स्त्रीवाद या संकल्पनेची मांडणी पुढे आली. वंदना शिवा ह्या यातील अग्रणी.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe