97632 06212 pwatsaru@yahoo.com

आव्हान शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढविण्याचे


महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राला ग्रासून राहिलेली मूलभूत समस्या म्हणजे राज्यातील शेतीक्षेत्राची कमी उत्पादकता ही होय. महाराष्ट्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्र १७३.८६ लक्ष हेक्टर एवढे असून त्यातील ५७.२ लक्ष हेक्टर क्षेत्रावर एकापेक्षा अधिक वेळा पेरा केला जातो. त्यामुळे एकूण पेरा केलेले क्षेत्र २३१.०६ लाख हेक्टर एवढे ठरते. यापैकी ७५.३० लाख हेक्टरवर तृणधान्ये, ३८.२५ लाख हेक्टरवर कडधान्ये, ४४.६८ लाख हेक्टरवर तेलबिया, ३८.७२ लाख हेक्टरवर कापूस आणि ९.३७ लाख हेक्टरवर ऊस ही पिके घेतली जातात. तसेच उर्वरित २४.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला व फळे ही उद्यान विभागीय पिके घेतली जात असावीत. महाराष्ट्रात भाजीपाला आणि फळबागा किती क्षेत्रावर आहेत ही माहिती आर्थिक पाहणीमध्ये दिलेली नाही. त्यामुळे एकूण लागवडीखालील क्षेत्र वजा पेरा केलेले क्षेत्र ही विचारात घेता उरलेले क्षेत्र उद्यान विभागीय असणार असा निष्कर्ष काढावा लागतो. महाराष्ट्राच्या शेतीचे सहजपणे नजरेत भरणारे वैगुण्य म्हणजे राज्यात ७५.३० लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये पिकविली जात असली, तरी राज्यातील सुमारे १२ कोटी लोकसंख्येची तृणधान्यांची गरज भागविण्याएवढे तृणधान्यांचे उत्पादन येथे होत नाही हेच होय. असे होण्यामागचे प्रमुख कारण राज्यातील तृणधान्याखालील शेतीची दर हेक्टरी उत्पादनाची नीचतम पातळी हेच होय.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe