97632 06212 pwatsaru@yahoo.com

छुप्या बाबी छुप्याच रहायला हव्यात


म्यानमारमधून कार्यरत असलेल्या दोन बंडखोर मणिपुरी गटांवर सीमा ओलांडून ‘अपूर्व’ अशी सैनिकी कारवाई करून ‘दहशतवादा’ला आळा घालून दहशतवाद विरोधी धोरणाचे एक ‘नवे उदाहरण’ घालून दिल्याचा जोरकस दावा केला गेला. त्या कारवाईनंतर विद्यमान सरकार व सरकारच्या पिट्टूंकडून प्रतिगामी ढोल बडविण्यात आले. एवढेच नाही तर मानसशास्त्राला वेठीस धरत देशाची मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त करून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी घोषणा केली, ‘बंडखोरांविरुद्धच्या एका साध्या कारवाईने देशातील संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेची मानसिकताच बदलून टाकली आहे... भारताच्या या नव्या भूमिकेची ज्यांना भीती वाटते आहे त्यांनी आत्ताच आमच्यावर टीका करणे सुरू केले आहे’, वगैरे. संरक्षणमंत्र्यांच्या या बढाईखोर विश्लेमषणाला वास्तवाच्या लोलकातून जरा नीटपणे तपासायला हवे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe