97632 06212 pwatsaru@yahoo.com

कैलास गौड


देशातील भटक्या विमुक्त जमातींचा अलीकडचा इतिहास 1857 च्या बंडापासून पाहावा लागतो. या बंडात या जमातींचा मोठा सहभाग होता. ठग आणि पेंढारी या जमातींनी ब्रिटिश सरकारच्या नाकी नऊ आणले होते. त्यांचा ब्रिटिशांनी बंदोबस्त केला असला तरी इतर काही भटक्या जमाती होत्या आणि त्यासुद्धा ब्रिटिश सरकारला आव्हान ठरल्या. त्यामुळे ब्रिटिशांनी या चौदा जमातींना पूर्णपणे गुन्हेगार ठरवलं आणि त्यांना तुरुंगात टाकण्यास सुरुवात केली. तुरुंगात टाकल्यामुळे कुटुंबंच्या कुटंबं नागरी जीवनापासून अलिप्त राहायला लागली. 1911 साली ब्रिटिशांना यांचं कुठेतरी पुनर्वसन केलं पाहिजे, असं वाटू लागलं म्हणून 1871 चा गुन्हेगार कायदा त्यांनी 'क्रिमिनल ट्राईब सेटलमेंट अॅक्ट' म्हणून दुरुस्त केला आणि त्यावेळच्या मुंबई राज्यात 52 सेटलमेंट्स त्यांनी स्थापन केली. उद्योगव्यवसाय असलेल्या मोठ्या क्षेत्रातल्या तारेच्या कुंपणात ही कुटुंबं ठेवली जायची. काही ठिकाणी शेती होती, काही ठिकाणी कागदगिरण्या, सूतगिरण्या होत्या. तिथे त्यांना कामही दिलं जात होतं. शिक्षणही दिलं जात होतं. पण तो एक उघड तुरुंगच होता. बाहेर एवढी मोठी स्वातंत्र्याची चळवळ चाललेली असताना एक समाजघटक हा त्यापासून पूर्ण अलिप्त होता आणि तो तसाच ठेवला गेला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe