97632 06212 pwatsaru@yahoo.com

राष्ट्रीय शिक्षण आराखडा गणिताच्या वर्गाचा केंद्रबिंदू-आशयाकडून प्रक्रियेकडे


राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने असे म्हटले आहे की, भारतातील गणिताच्या वर्गांमधील दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आपण आजपर्यंत गणिताच्या आशयाकडे जास्त लक्ष देत होतो, त्याऐवजी आपण गणितातील आकलनप्रक्रियेकडे लक्ष दिले पाहिजे. उदा. एखाद्या वस्तूतील/सांख्यिकी अथवा इतर साम्य दर्शविण्यासाठी उपयोगात आणावयाची प्रतिरूपे यांच्यातील निवड करणे किंवा ती नव्याने तयार करणे; तसेच कोणत्याही गणिती प्रक्रियेत ज्या गोष्टी अपरिवर्तनीय राहतात त्यांचा गणितात शोध घेतला जातो, नेहमी आढळणारी उदाहरणे आणि टोकाची उदाहरणे यांचे निरीक्षण करून नवीन अटकळी बांधल्या जातात, बरेचदा सिद्धांत खोडून काढणारी उदाहरणे शोधण्याचा प्रयत्न होतो; एखादा समूह असेल तर त्यातील वस्तूंची संख्या किती याचा अंदाज घेतला जातो; कधीकधी एखादी संख्या निश्चितपणे कळत नसेल तर तिच्या आसपासची संख्या शोधावी लागते; पुष्कळदा असेही होते की दिलेला प्रश्न फार अवघड वाटत असेल तर एखादा सोपा पोटप्रश्न किंवा मूळ प्रश्नाचे अधिक व्यापक रूप लक्षात घेऊन ते आधी सोडवावे लागतात, अशा या अनेक प्रक्रिया गणिताच्या अभ्यास करताना वापराव्या लागतात आणि शाळेत शिकवताना अशा प्रक्रियांचा अभ्यास करणे शक्य आहे व इष्टही आहे. तामिळनाडू सायन्स फोरमच्या माध्यमातून मुले आणि शिक्षकांबरोबरील संवादाच्या आमच्या अनुभवाधारे याची मांडणी करतो आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe