97632 06212 pwatsaru@yahoo.com

मनुचा मासा,शंकासमाधान @ शाखा


गेली अनेक वर्षे जो युक्तिवाद ऐकू येई, तो आताही ऐकू यावा याचा अर्थ कोणी काहीच बदललेले नाही काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कोणी काही विधान केले की संघाच्या पदाधिकार्यांकडून ठरावीक उत्तर येते; ते म्हणजे टीकाकारांनी प्रत्यक्ष संघशाखेवर जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करवून घ्यावे! गेल्या महिन्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका करताच एक केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी त्यांना असाच सल्ला दिला. एक तर असा सल्ला राहुल गांधीच काय, अन्य कोणताही टीकाकार पाळणार नाही हे जितके खरे, तितकेच खरोखर कोणी टीकाकार शाखेवर येऊन गेला आणि त्याने/तिने आपले मत बदलले असेही झाल्याचे असू आले नाही. दुसरे, एखाद्याने टीका केली रे केली की त्याला वैचारिक, तात्त्विक, तार्किक प्रत्युत्तर न देता ‘शाखेवर या, सारे समजेल’ असेच देणे संघावर उलटू शकते. कारण संघ आता केंद्रात व राज्यांत भाजपच्या रूपाने सत्तेत आहे. अगदी किरकोळ उदाहरण द्यायचे झाल्यास मांसाहाराचे देता येईल. मांस खाणे मना करणार्या संघाला ‘तुम्ही खाऊन तर बघा अन् मग बोला’असे सुनावल्यास पटेल का ते? हिंदू स्त्रियांनी चार मुले जन्मास घालावीत असे जेव्हा संघाचा एक कार्यकर्ता म्हणतो, तेव्हा त्याला आधी अनुभव घ्यायला सांगितले तर संघ ऐकेल काय? कोणी कशीही टीका केली तरी त्याला प्रत्यक्षानुभवाचा प्रसाद घ्यायला सांगायचे ही एक पळवाट झाली. इस्लाम अमुक तमुक आहे असे जेव्हा एखादा हिंदू म्हणतो, तेव्हा एखाद्या मुसलमानाने त्याला ‘इस्लाममध्ये या, सारे मत पालटेल’ असे सुनावणे जितके चुकीचे आहे, तितकेच ‘संघ शाखेवर या आणि आपले डोळे उघडून घ्या’ असे म्हणणे गैर आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe