97632 06212 pwatsaru@yahoo.com

सुशासन आवडे सर्वांना


जी. संपथ सध्या भारतामध्ये सुशासनाचे जोरदार वारे वाहत आहेत आणि तेही साध्यासुध्या सुशासनाचे नाही तर ‘कमाल सुशासना’चे, शक्यतो ‘किमान सरकार’च्या जोडीने वाहणारे वारे. भारत हा एकमेव असा देश आहे की जेथे नाताळचा दिवस हा सुशासन दिन म्हणून अधिकृतपणे साजरा केला जातो. सुशासन गरजेचे आहे की नाही याबद्दल कोणी बोलत नाही, बोलतात ते थेट सुशासनाबद्दलच. सुशासनाच्या गुणवत्तेबाबतच्या या अपूर्व लोकोत्साहाच्या पाठीमागे खुद्द पंतप्रधानमहाशय आहेत. त्यांच्या स्वतःच्या संकेतस्थळावर असे म्हटले आहे : “नरेंद्र मोदींमुळे सुशासन हा आज देशभरात - अगदी गरम कॉफीचा घोट घेत गप्पा मारणार्या महाविद्यालयीन तरुणांपासून ते थेट वृत्तवाहिन्यांवरील वादावादी करणार्या तज्ज्ञांपर्यंत - चर्चेचा विषय झालेला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe