12 जूनपासून सुरू झालेले एफटीआयआय विद्यार्थ्यांचे आंदोलन आजतागायत चालूच असले तरी हा प्रश्नक हिंस्त्र थंडगारपणे वेळकाढूपणे हाताळत सरकारने आपले लोकविरोधी धोरण दाखवून दिलेय. तेव्हा या आंदोलनास सुजाण नागरिकांनीही सक्रिय पाठिंबा देत सरकारला संदेश द्यायला हवा. कारण हा प्रश्नो केवळ ‘गजेंद्र चौहान हटाव’पुरता सीमित नाही तर महत्त्वाच्या संस्थांच्या खाजगीकरण विरोधाचा, स्वायत्ततेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही मूल्यांचा आणि फॅसिझमविरोधाचा आहे.