97632 06212 pwatsaru@yahoo.com

राज्यांच्या राजकारणाचे अभ्यासपूर्ण विश्लेुषण


सन 1990 नंतर भारतीय राजकारणावरचं काँग्रेस पक्षाचं वर्चस्व संपुष्टात आलं. मात्र त्यानंतर दीर्घकाळापर्यंत कोणताही एक पक्ष काँग्रेसच्या प्रभावाची जागा घेऊ शकला नाही. म्हणजे भाजपची या काळात विविध राज्यांत प्रचंड वाढ झाली. मात्र काँग्रेसप्रमाणे सर्व देशातील राज्यांवर हा पक्ष आपला संपूर्ण प्रभाव प्रस्थापित करू शकला नाही तर अनेक राज्यात राज्यव्यापी पक्षांची सद्दी सुरू झाली. हे राज्यपातळीवरचे पक्ष त्यांच्या-त्यांच्या राज्यातच प्रभावी झाले असे नाही तर आघाड्यांच्या राजकारणाद्वारे हे पक्ष राष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव टाळू लागले. ही गोष्ट स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात पहिल्यांदाच होत होती. यामुळे राज्यपातळीवरचं राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारं मुख्य क्षेत्र म्हणून पुढे आलं.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe