97632 06212 pwatsaru@yahoo.com

वैद्यकीय क्षेत्रातील दोन महत्त्वाचे प्रश्न


नीट अभ्यास केला तर असे लक्षात येते की, गेल्या पाच वर्षांत कोल्हापुरातील चांगल्या अशा पंधरा डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून मोठ्या हॉस्पिटलात किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नोकर्या पकडलेल्या आहेत. आजही त्यांच्या या निर्णयामुळे हळहळणारे पेशंट भेटत असतात. असे होण्याचे कारण सरकारचा कल लहान हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स यांना जगणे कठीण करणे (डिस्करेज करणे) हे आहे. किमान जागेच्या अटी (आजच्या फारच महाग रिअल इस्टेट दरांचा विचार करता) जिने, पॅसेजेस, फायर ऑडिट यांच्या अशक्यप्राय अटी, बॉम्बे नर्सिंग होम किंवा क्लिनिकल एस्टॉब्लिशमेंट अॅक्ट (हा अॅक्ट अमेरिकेकडे तोंड करून, अमेरिका आणि भारत यांच्यातील आर्थिक आणि कल्चरल लॅग, लोकसंख्या यांचा काहीही विचार न करता तयार केला आहे.), विमा कंपन्या आणि त्यांच्या टीपीए नावाच्या कंपन्या (यांना माझा एक मित्र आजच्या काळातील वैद्यकीय सावकार म्हणतो) यांच्या त्रासदायक अटी, या व इतर काही कारणांमुळे आता सुरू असलेली लहान हॉस्पिटल्स काही काळ कशीबशी सुरू राहतील आणि हळूहळू बंद पडतील. नवीन लहान हॉस्पिटल आता सुरू होणे अशक्यच दिसते. त्यामुळे शहरातील आणि खेड्यातून मोठ्या आशेने शहरात आलेल्या पेशंट्सना, एक तर सरकारी दवाखाना किंवा मोठाली कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे फक्त दोनच पर्याय शिल्लक राहणार आहेत. आताच काहीसे तसे झाले आहे. या मोठ्या दवाखान्यातील दोन त्रासदायक गोष्टींची मी येथे चर्चा करणार आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe