97632 06212 pwatsaru@yahoo.com

वर्चस्वशाली शेतकरी जातींमधील आरक्षणज्वर!


पंजाब-दिल्ली-हरयाणातील जाट, राजस्थानातील गुर्जर, महाराष्ट्रातील मराठा, आणि आता गुजरातेतील पटेल-पाटीदार हे असे जातसमूह आहेत जे वर्चस्वशाली शेतकरी जातसमूहाचे भाग असूनही आज आरक्षणाकरिता रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे ऐंशीच्या दशकातील आरक्षणविरोधी आंदोलनात हे सगळेच अग्रस्थानी होते. जातिव्यवस्थेच्या उतरंडीत निम्नस्थानी असलेल्या दलितांवर अन्याय-अत्याचार करण्यातदेखील हेच वर्चस्वशाली शेतकरी जातसमूह अग्रस्थानी असतात हे वारंवार दिसून आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेल्या नव्या राजकीय व्यवस्थेत त्यांनी जातीचे 'संख्याबळ' आणि जमीनमालकीतून प्राप्त झालेले 'वित्तबळ' उपयोगात आणून सातत्याने राजकीय सत्ता उपभोगली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांत आजवर सर्वाधिक मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मंत्री अनुक्रमे मराठा आणि पाटिदार जातीचेच राहीले आहेत. आजही गुजरातच्या मुख्यमंत्री पटेल आहेत. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मराठा नेते जेव्हा मुख्यमंत्रीपद भूषवीत होते तेव्हाच महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन मूळ धरू पाहत होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe