97632 06212 pwatsaru@yahoo.com

नमस्ते सत्ता वत्सले...


भारताचे हिंदूराष्ट्र करायला अधीर झालेल्या संघाचे खरे रूप 2, 3, 4 सप्टेंबर रोजी दिल्लीत उघडे पडले. मोदी सरकारातील अनेक मंत्र्यांना आपल्यासमोर उभे करून (किंवा बसवून) संघनेत्यांनी हिंदूराष्ट्रनिर्मितीचा आपला कार्यक्रम मंत्र्यांना राबवायला दिला. स्वयंसेवकच ते! त्यांनी चुपचाप (संघात तसेच असते) राबवणुकीची शपथ घेतली न् कबुली दिली आणि राज्यघटनेला स्मरून घेतलेली शपथ कशी सोडून द्यायची याचे डावपेच मनात घोळवत घर गाठले. एक सवाल मनात आला. मातृसंस्था अथवा पितृसंस्था अशा मंत्री वगैरे झालेल्या पोक्त, प्रगल्भ, वयस्कर आणि स्वकेंद्री नेत्यांवर इतका कब्जा कशी करू शकते? संघाने आज्ञा सोडावी आणि यांनी मान डोलावून कामास निघावे हे आजच्या स्वतंत्र, स्वाभिमानी व स्वेच्छानुसारी जगात कसे काय घडते? संघवाले म्हणतील, कसे बरोब्बर बोललात! हीच तर संघाची किमया असते. तो पंतप्रधान असो की मंत्री, शास्त्रज्ञ असो की डॉक्टर, पत्रकार असो की प्राध्यापक, आमचा स्वयंसेवक संघनेत्यांसमोर साधासच्चा आज्ञाधारक बच्चा असतो. नाहीतर तुम्ही पुरोगामी, प्रश्न विचाराल अन् असे फाटे फोडाल की झालेच मातेरे! चला, पुरोगाम्यांनो, अभ्यास करा न् अंतर्मुख व्हा...

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe