97632 06212 pwatsaru@yahoo.com

मोहन भागवतजी फेसबुकमधून


‘कल्पना किजिये एक ऐसे समाज की जहाँ केवल एक ही वर्ण हो, फिर क्या होगा?’ 31 ऑगस्ट रोजी केलेल्या 10 परिच्छेदांच्या चिंतनाचा हा पहिला प्रश्न आहे. 2015 साली कल्पना कशाची करत आहेत भागवत? चातुर्वर्ण्य समाप्त झाल्याची किंवा छुप्या पद्धतीने कसा अजून सुरू आहे याची नव्हे. तर एकच वर्ण ज्या समाजात असेल तो कसा असेल याची वा! धन्य आहे सरसंघचालकांची! ते विचारच करतात कित्येक शतकांपूर्वीचा. केवढा वैचारिक झपाटा आहे त्यांचा. संघ मागे मागे जात राहतो अन् चातुर्वर्ण्याच्या काळाची समाजव्यवस्था पुनरुज्जीवित करू पाहतो हा आरोप सिद्धच तो करू टाकतो. यावर कोणी संघवाला आक्षेप घेऊन म्हणेल की अहो, नुसती कल्पना करायला काय जाते? कमाल आहे, कल्पनासुद्धा विषमतेचीच सुचावी तुम्हाला? ज्या चातुर्वर्ण्यमुळे एवढा मोठा देश थिजून गेला, माणसाला त्याने जन्माधिष्ठित कामे करायला लावली अन् शूद्रांना तर अस्पृश्य ठरवेपर्यंत ज्याची मजल गेली तो चातुर्वर्ण्य तुमच्या रिकामपणाच्या चिंतनाचा विषय असावा? शरद यादव बरोबरच म्हणाले होते, संघाचा मुसलमान विरोध केवळ डावपेचाचा एक भाग आहे. त्याला चातुर्वर्ण्याची पुनःस्थापनाच हवी आहे!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe