97632 06212 pwatsaru@yahoo.com

अब्दुल रहेमान चुगताई


सुधाकर यादव एकोणिसाव्या शतकात वसाहतवादी सत्ता देशभर प्रस्थापित झाली. देशातील महत्त्वाची शहरे औद्योगिक विकास साधण्यासाठी दळणवळणाने ती परस्परास जोडली गेली. वेगवेगळ्या प्रदेशात असलेली संपन्न कारागिरीची दखल ब्रिटिश सत्तेने घेतली. इथल्या निपुण कारागिरीला प्रशिक्षण देण्याच्या हेतूने देशातल्या महत्त्वाच्या शहरात तशा प्रशिक्षण देणार्या कलासंस्थाही स्थापन केल्या. मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि लाहोर या देशाच्या चतु:सीमेवरील शहरांत या संस्था स्थापन केल्या. प्रादेशिकतेचा विचार, पौराणिक कथेपेक्षा ऐतिहासिक विषय, व्यक्ती, पारंपरिक कलेपेक्षा काव्य-साहित्याचा विचार रंग, रेषा, तंत्र या सर्व पारंपरिक तपशिलाशिवाय स्वतंत्र मांडणी करणारे बंगाल आणि बॉम्बे स्कूल समकालीन स्वदेशी विचाराचा चित्रकार म्हणून अब्दुल रहेमान चुगताई वेगळे आहेत. अवनिंद्रनाथ टागोरांचेच शिष्य असल्याने त्यांचा प्रभाव स्वाभाविक आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe