97632 06212 pwatsaru@yahoo.com

आजचा दुष्काळ निसर्गनिर्मित की मानवनिर्मित?


पाणी म्हणजे जीवन. पाण्याविना सजीव सृष्टी जिवंत राहू शकत नाही. सर्वसाधारणपणे सजीव सृष्टीची गरज गोड्या पाण्याची असते. आणि या गोड्या पाण्याचा मूलभूत स्रोत म्हणजे पावसाच्या रूपाने पृथ्वीवर होणारा गोड्या पाण्याचा वर्षाव हा होय. सूर्याच्या उन्हामुळे प्रामुख्याने समुद्राच्या खार्या पाण्याची वाफ होते आणि या वाफेचे ढग बनतात. अशा ढगांमुळे पाऊस पडतो. पाऊस पडला की, ओढे, नाले व नद्या वाहू लागतात. पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्यामुळे आड व विहिरी तुडुंब भरतात. तसेच भूगर्भातील पोकळ्यात पाण्याचे पुनर्भरण होते. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्यांमुळे पडणारा पाऊस आपल्याला शुद्ध गोड्या पाण्याचा पुरवठा करतो. आपण पावसाळ्याचा कालखंड चार महिन्यांचा मानत असलो तरी प्रत्यक्षात या चार महिन्यांमधील आठ दहा दिवसात बहुतांशी पाऊस पडत असल्यामुळे या आठ दहा दिवसात पडलेल्या पावसाचे पाणी साठवून ठेऊन आपल्याला त्या पाण्यावर वर्षभर गुजारा करावा लागतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe