97632 06212 pwatsaru@yahoo.com

मासिक पाळी अपवित्र कशी?


माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले. आता मंगळावर जायच्या गोष्टी करत आहे. रोज नवनवीन शोध लागत आहेत. सहज आपण म्हणून जातो की, आपण विज्ञानयुगात वावरत आहोत. एवढे असूनही, ‘स्त्रियांचे पावित्र्य सिद्ध करणारी स्कॅनर मशीन निर्माण होईल तेव्हा आम्ही स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाबाबत विचार करू’ असे वक्तव्य केरळमधील शबरीमला मंदिराच्या अध्यक्षांनी केलं. खरं तर त्यांच्या व्यक्तव्यातच विरोधाभास आहे. जसं कोणत्याही मंदिरातील देव कितीही जागृत आणि नवसाला पावणारा असला तरी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास मात्र पोलिसांनाच करावा लागतो. या तपासात पोलीस विज्ञानाच्या साहाय्याने बनवल्या गेलेल्या अनेक साधनांचा/गोष्टींचा वापर करतात. कोणत्याही पुजार्याला सिद्धयोगाने चोर का सापडत नाही? तसंच बायकांना मासिक पाळी चालू आहे की नाही हे धार्मिक सिद्धयोगाने पुजार्यांना समजायला हवं; त्यासाठी विज्ञानाने शोध लावलेल्या स्कॅनर मशीनची आवश्यकता का? म्हणजे धर्मरक्षकांना देवांचे पावित्र्य, परंपरांचे पालन करण्यासाठी शेवटी विज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. पुन्हा एकदा विज्ञानाचा गैरवापर स्कॅनर मशीनच्या साहाय्याने स्त्रीलिंगी गर्भ आहे हे समजताच तिची गर्भातच हत्या केली जाते. तसाच हा प्रकार. म्हणजे पुन्हा एकदा स्त्रीत्वाचा, मनुष्यत्वाचा अपमान.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe