97632 06212 pwatsaru@yahoo.com

विषमतेचा मूक साक्षीदार


पंतप्रधान महाशय, तुमचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ती तारीख मला नेमकी आठवत नसली तरी ते वर्ष मात्र 2002 होतं आणि संदर्भ गुजरात दंगलींचा होता. त्या वर्षी मी माझ्या खेड्याजवळच असलेल्या एका महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला होते. आज मी 30 वर्षांची असून तामिळनाडूमधील तिरूवन्नमलाईजवळ असलेल्या अथिपक्कम या खेड्यात राहणारी एक कवयित्री आहे. स्वतःची व्यावसायिक ओळख मी कवयित्री म्हणून करून देते त्याचे कारण सध्या मी बेरोजगार असल्याने घरी बसून कविता करणे हाच माझा उद्योग झाला आहे. 2015 मध्ये मात्र माझ्यामध्ये भलताच उत्साह होता. त्या वर्षी मी तमिळ साहित्यातून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. ‘मद्रास’ या तमिळ सिनेमासाठी लिहिलेल्या माझ्या गीतांना त्याच वर्षी चार पुरस्कारही मिळाले. लवकरच रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या सिनेमातही मी लिहिलेली गाणी असायची शक्यता आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe