97632 06212 pwatsaru@yahoo.com

पुरुषभान निर्माण करणे ही स्त्रीमुक्ती चळवळीची जबाबदारी


स्त्रीमुक्ती चळवळीकडे कसे वळलात? जून 1975 मध्ये देशात आणीबाणी घोषित झालेली होती. तेव्हापासून शहादा इथल्या श्रमिक संघटनेचे कामही थांबले होते. महागाई प्रतिकार समितीमध्ये काम करणार्या सर्व राजकीय नेत्या कारागृहात होत्या. या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये लालनिशाण पक्षाशी निगडित ज्योती म्हापसेकर, शारदा साठे व पुण्यातल्या लीलाताई भोसले आणि गोखले संस्थेतल्या सुलभा ब्रह्मे, कुमुद पोरे अशा काही स्त्रियांनी एकत्र येऊन स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद आयोजित केली. त्याचबरोबर ‘युनो’ने घोषित कलेले ‘महिला वर्ष’ साजरे केले. ही परिषद हा माझ्या जीवनातला एक महत्वाचा मैलाचा दगड ठरला. नेमक्या कोणत्या वाटेने जावे याचा निर्णय घ्यायला मात्र मला 1988 हे वर्ष उजडावे लागले. मला निर्णय घ्यायला मदत करणारी एक घटना घडली. मला हॉलंड इथल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली आणि ‘स्त्रिया आणि विकास’ या विषयात सोळा महिन्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करून एम. ए. ही पदवी संपादन करून मी परतले. एकटे राहणे, एकटे फिरणे यामुळे आत्मविश्वास आला होता. 1988 मध्ये मी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत प्रपाठक (सहयोगी प्राध्यापक) म्हणून रुजू झाले आणि मला माझी वाट सापडली, असे म्हणता येईल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe