97632 06212 pwatsaru@yahoo.com

बाजीराव मस्तानी : जात-पितृसत्तेने लादलेले मृत्युपर्व


दिनांक 18 डिसेंबर, 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावर ब्राह्मण्यवादी संघटनांनी आक्षेप घेतला. या संघटनांचे म्हणणे होते की, बाजीरावच्या (पहिला बाजीराव पेशवा : इ.स. 18 ऑगस्ट, 1700 ते इ.स. 28 एप्रिल, 1740) चरित्राचे या चित्रपटातून विकृत दर्शन घडते. मात्र या संघटनांचे खरे दुखणे म्हणजे बाजीरावच्या त्याची मुस्लीम पत्नी मस्तानीप्रति प्रेमाचे दर्शन व बाजीरावास पुण्यातील तत्कालीन ब्राह्मणशाहीने दिलेला प्रचंड त्रास, मस्तानीचा मुस्लीम म्हणून झालेला, ब्राह्मणशाहीने केलेला छळ हे चित्रपटातून सत्यरीत्या आणि स्पष्टपणे प्रदर्शित केलेले आहे, हे आहे. कारण तत्कालीन ब्राह्मणशाहीस मुस्लीम स्त्री ही रक्षा/रखेल म्हणून मान्य आहे. परंतु ती पत्नी म्हणून मुळीच मान्य नाही. मस्तानीला वैध पत्नीचा दर्जा मिळावा, यासाठी बाजीरावने केलेला संघर्ष, ब्राह्मणशाहीचा बाजीराव-मस्तानीच्या नात्यास होणारा विरोध याचे सत्य, यथार्थ चित्रण हा चित्रपट करतो. ब्राह्मणी पितृसत्ता, भारतीय जातिव्यवस्था, पुरुषसत्ता, स्त्रियांच्या शोषणातील तीव्रतेने विविध स्तर आणि आंतरछेदितता तसेच त्यांना असणारे सद्यकालीन जमातवादाचे संदर्भ यांची यानिमित्ताने चर्चा होणे गरजेचे ठरते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe