97632 06212 pwatsaru@yahoo.com

दलित स्त्रीकविता : समकालीन संदर्भ


मानवाच्या उर्जितावस्थेत स्त्रियांनी प्रथम शेतीचा शोध लावला आणि मानवी जीवनात क्रांती घडवून आणली. अर्थात तेव्हापासून स्त्रीचं निसर्गाशी आणि पर्यायाने सृजनशीलतेशी नातं निर्माण झालं. स्त्री म्हणून तिच्याजवळ असलेल्या शरीर सृजनतेबरोबर तिच्या भावनिक आणि बौद्धिक सृजनाने मूर्त स्वरूप धारण केलं त्यातूनच गीत, संगीत, नृत्य अशा कलांचा उदय झाला. निसर्गाच्या सान्निध्यात तिची तरल भाववृत्ती अधिकाधिक बहरून आली आणि म्हणूनच गीत-गायन कला-साहित्याचा उगम स्त्री प्रतिभेतून झाला असं आपण म्हणू शकतो. अर्थातच ज्या काळात शब्दलिपीचा शोध लागला नव्हता अशा काळातील साहित्य हे मौखिक स्वरूपाचं होतं. त्यामुळे अशा साहित्याचा इतिहास उपलब्ध नाही. परंतु जेव्हा शब्दलिपी अस्तित्वात आली त्या काळापासून म्हणजे वेदकालीन साहित्यातील मैत्रीयी, गार्गी या प्रतिभावंत स्त्रियांपासून साहित्य क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग आढळून येतो. पुढे गौतम बुद्धाने स्त्रियांना ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्राप्त करून दिल्यानंतर थेरी गाथांमधून बुद्ध भिक्कुणींनी बौद्धकालीन साहित्यात आपल्या प्रतिभेची साक्ष दिली आहे. तसेच मध्ययुगीन काळात महानुभव पंथातील महदंबा, बायसा आदी स्त्रियांच्या साहित्याचा इतिहास उपलब्ध होऊ शकतो. संत साहित्याच्या परंपरेत एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या भक्तीपारायण साहित्याच्या प्रवाहात चोख्याची महारी, जनाबाई, मुक्ताई या स्त्रियांनी आपल्या अभंग-ओव्यांनी भर टाकलेली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe