97632 06212 pwatsaru@yahoo.com

जनमत 2016 : प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष?


भारतातला निवडणूक आयोग हा सदैव व सर्वात व्यस्त असलेला व चर्चिला जाणारा आयोग आहे! सध्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य हे 2016 च्या एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी राज्यांच्या दौर्यावर आहेत. केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडेचरी व आसाम या राज्यांत सध्या निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. या सर्व राज्यांतील परिस्थिती पाहता राष्ट्रीय पक्षांना अगोदर मिळालेल्या जागा टिकवता येतात का हे आव्हानच असेल कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकांमधले Advantage हे जसेच्या तसे कुठल्याही राज्यात परिवर्तित झालेले नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आसाम वगळता इतर चारही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचाच बोलबाला राहणार आहे. आसाम वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये सलगपणे कुठलीही एक आघाडी किंवा पक्ष सत्तेत नव्हता. भारतीय जनता पार्टीने आसाम निवडणुकांसाठी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे. जो त्यांनी बिहार निवडणुकीत शिकलेल्या धड्याचा भाग असू शकतो अन्यथा आसाममधल्या धार्मिक ध्रुवीकरणाचा पाया असू शकतो. ह्याचा आधार असा की सोनोवाल यांच्या वक्तव्यांची सुरुवातच ही धु्रवीकरणाला पाठिंबा देणारी आहे. संघ व संघाच्या गुप्तपणे चालणार्या सामाजिक/धार्मिक ध्रुवीकरणाचे पडसाद येत्या काळात पूर्वोत्तर राज्यात आपल्याला दिसून येतीलच. अरुणाचलचे अस्थिर सरकार, नागा कराराची अंतिमत: अंमलबजावणी व आसाम निवडणुकांच्या काळात अनुसूचित जमातींचा दर्जा मागणार्या जातसमूहांची मागणी मान्य करणे ह्या एकाच वेळेस भाजपाला राजकीय व सामाजिकदृष्ट्या फायदा करुन देणार्या गोष्टी ठरू शकतील.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe