एखाद्या धुमकेतूप्रमाणे रोहित वेमुला निघून गेला, नेहमीचे परिचित अडसर बाजूला करत अनेकांना गलबलवून गेला, असं कसं झालं? कदाचित पूर्वजांकडून आपल्या वारशाने आलेली धुमकेतूंबद्दलची धास्ती त्याला कारणीभूत असावी. धुमकेतू हा दारावर येऊन ठेपलेल्या अरिष्टाचे दुश्चिन्ह असतो. आभाळाला जाळत गेलेल्या त्या एका आत्म्यासाठी आपण रडत असतो, पण खरं तर त्यापाठोपाठ येऊ घातलेल्या अधिक मोठ्या अनर्थाबद्दलची कुशंका आपण व्यक्त करत असतो. ज्या संस्थेत, भारतातील सार्वजनिक विद्यापीठात, रोहितने आत्महत्या केली, ती संस्थाही आज आत्महत्येच्या प्रयत्नात आहे. रोहितच्या जाण्यानं समोर आलेलं हे मोठं अरिष्ट आहे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.