97632 06212 pwatsaru@yahoo.com

रोहितचे बलिदान विसरणार नाही!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आम्हाला राष्ट्रवादाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आमची मुळं या देशात रुजली आहेत आणि आमचं या देशावर प्रेम आहे. या देशातल्या 80 टक्के गरीब जनतेसाठी लढणं हा आमच्या दृष्टीने देशभक्तीचा अर्थ आहे बाबासाहेबांच्या विचारावर आणि भारताच्या संविधानावर आमची दृढ निष्ठा आहे. आम्ही हे ठणकावून सांगू इच्छितो की, भारतीय संविधानाला आव्हान देण्याचा कोणाकडूनही प्रयत्न झाला, भले तो संघवाल्यांकडून का असेना, आम्ही ते खपवून घेणार नाही. बाबासाहेबांच्या विचारावर आणि भारताच्या संविधानावर आमची दृढ निष्ठा आहे. झंडेवालन (संघाचे दिल्लीतील मुख्यालय) आणि नागपूरमध्ये शिकवले जाणारे भलते संविधान आम्हाला मंजूर नाही. आमची निष्ठा मनुस्मृतीवर नाही, या देशातल्या जातिप्रथेवरही नाही. भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर दुरुस्तीवादी उपायांची (corrective measures) भाषा करतात. बाबासाहेबांनीच फाशीची सजा रद्द करावी असे मत व्यक्त केले होते, बाबासाहेबांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर दिला होता. आम्ही या संविधानाचे आणि आमच्या हक्कांचे रक्षण करू इच्छितो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe