97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकर आणि ग्राम्शी


भारतातील विचारवंतांनी मांडलेले विचार आणि केलेली तत्वचिकित्सा यांचे जागतिक विचारव्यवहारात काय स्थान असते? खास भारतीय प्रश्न आणि समस्या यांच्या संदर्भापुरतेच ते विचार प्रस्तुत असतात की व्यापक तात्त्विक अधिष्ठानाविषयीच्या मौलिक भूमिकांविषयी असे विचारवंत काही मांडणी करीत असतात? वेगळ्या भाषेत म्हणजे, ‘भारतीय’ विचार हा भारतीय असण्याबरोबरच एकूण जागतिक विचारव्यवहाराशी संलग्न असतो की नाही? भारतीय विचारांबद्दल अशा प्रकारची चर्चा फार कमी होते कारण एक तर असे मानले जाते की ‘भारतीय’ विचारवंत खास करू भारतातील प्रश्नांबद्दल बोलत-लिहीत असतात आणि ते प्रश्न इतके वेगळे असतात की त्यांचा बाकीच्या समाजांच्या पुढील नैतिक-तात्त्विक प्रश्नांशी जणू काहीच संबंध नसतो. दुसरीकडे असेही कदाचित काही वेळा मानले जाते की तात्त्विक मांडणी ही जणू काही उत्तर गोलार्धातील तत्वज्ञ-अभ्यासक यांची खासियत आहे आणि त्यांनी मांडलेल्या तात्विक चौकटी (paradigms) आणि विश्लेषणाच्या कोटी (categories) यांच्या अनुषंगाने भारतीय विचारवंत जे काही मांडतात त्याचा अर्थ लावावा; त्या प्रस्थापित-प्रचलित चौकटी आणि कोटी यांच्यामध्ये आपले भारतीय विचार नेमकेपणाने बसवून दाखविले की भारतीय विचारांची नीट व्यवस्था लावता येते. यात आणखी भर पडते ती त्या त्या भारतीय विचारवंतांच्या सामाजिक स्थानाची आणि स्वतःच्या समकालीन राजकारणाची. त्यानुसार आपण प्रत्येक विचारवंताची व्यवस्था लावतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe