97632 06212 pwatsaru@yahoo.com

भाग जो स्वतंत्र झाला


गांधी-आंबेडकरांमधील झगडा हा ऐतिहासिकच म्हटला पाहिजे. या झगड्याची सुरुवात 1930-32 मधल्या गोलमेज परिषदांमध्ये झाली. पहिल्या गोलमेज परिषदेत दलितांचे, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर गेले होते. काँग्रेसचा बहिष्कार होता. दुसर्या परिषदेत काँग्रेसने बहिष्कार उठवला आणि गांधींनी उपस्थित राहण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी अस्पृश्य हे हिंदू समाजाचा भाग असल्याने आणि मी हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने अस्पृश्यांचेही मी प्रतिनिधित्व करतो अशी आग्रहाची भूमिका घेतली. आंबेडकरांसाठी अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग नसून एकमेवाद्वितीय रीतीने दडपलेले लोक या अर्थाने पूर्णपणे वेगळा भाग होते (स्वतःचे वर्णन त्यांनी एकदा ए पार्ट अपार्ट असे केले होते). ते राजकीय स्वातंत्र्यासाठी तयार होते, इतकेच नव्हे तर स्वतंत्र भारतातील काँग्रेसचे अटळ प्रभुत्वही त्यांना मान्य होते, फक्त काही अधिकची संरक्षणे त्यांना हवी होती इतकेच.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe