97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती


राजकीय आणि सामाजिक सुधारणेच्या आघाडीवर मोठी कामगिरी केल्यानंतर 1935 मध्ये डॉ. आंबेडकर एका महत्त्वाच्या तर्कशुद्ध निष्कर्षावर पोहचले. ज्या शहरातील एका मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष केला होता त्यापासून केवळ शंभर किलोमीटरहून कमी अंतरावर असलेल्या गावातच त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्मलेलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली. त्यांचा हा धर्मांतराचा निर्णयही एक चिकित्सक व्यवहार्य कृती म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. राजकीयदृष्ट्या आकर्षक असे अन्य संभाव्य पर्याय उपलब्ध असताना त्यांचा त्यानंतरचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय हाही त्यांच्या विवेकी श्रद्धेशी मिळताजुळता होता. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यामधले नाते एकेरी नसून गतिशील आहे आणि हिंदू धर्म ह्या नावाखाली झाकलेल्या पण मूलतः मानवी आणि म्हणूनच एकात्म असलेल्या भारतीय परंपरेच्या प्रभुत्ववादी अपहरणाची बौद्ध धर्म ही एक मूलगामी चिकित्सा असल्याची जाणीव त्यांच्या या भूमिकेत होती. या विषयाची चर्चा पुढील तीन मुद्द्यांच्या संदर्भात या लेखात केली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe