97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकर आणि आधुनिक बौद्धधर्म : सातत्य आणि वेगळेपण


सामूहिक धर्मांतर घडवून आणून आणि बुद्धाच्या धम्माची पुनर्मांडणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक बौद्धधर्माला महत्त्वाची देणगी दिली आहे. या देणगीचा अर्थ मात्र नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे. तो समजून घेण्याची एक दिशा अशी की आंबेडकरांनी केलेली पुनर्मांडणी मूळ बौद्धधर्माशी कशाप्रकारे संबंधित आहे आणि परंपरेपासून ती कशी फारकत घेते ते समजून घेणे. पण आंबेडकरांची पुनर्मांडणी इतर अशाच पुनर्मांडणीच्या प्रयत्नांपासून वेगळी काढून सुटेपणाने समजून घेणे चुकीचे नाही तरी निदान अपुरे ठरेल. बौद्धधर्माविषयी आधुनिक काळात, विशेषत: गेल्या शतकात भारताबाहेर काय घडले, नेमकेपणाने बोलायचे तर आंबेडकरी बौद्धधम्माच्या चौकटीबाहेर काय घडले, त्यापासून आंबेडकरांची पुनर्मांडणी वेगळी करता येणार नाही. आंबेडकरी बौद्धधम्माचे समर्थक बर्याचदा आंबेडकरांच्या योगदानाकडे एका संकुचित दृष्टिकोनातून पाहतात. ते असे मानतात की, आंबेडकरांचा ‘द बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ म्हणजे बौद्धधम्माची परिपूर्ण व अंतिम मांडणी आहे. येथे मी नम्रपणे सुचवू इच्छितो की, हा दृष्टिकोन संकुचित होईल. बौद्धधम्माचे नव्याने आकलन करून घेणे ही जगभरातील अनेक बौद्धचिंतकांसमोरची समस्या होती. त्यांच्या समस्यांमध्ये साम्य होते त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या प्रतिसादांमध्येही साम्य होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe