97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘भारतमाता की जय’ आणि राज्यघटना


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार म्हणत असतात की आपली राज्यघटना म्हणजे एक पवित्र ग्रंथ आहे. तसे असले तरी ‘भारतमाता की जय’चा आग्रह धरणे हे राज्यघटनेच्या गाभ्याविरुद्ध आहे, असे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने नुकताच एक राजकीय ठराव संमत केला. त्या ठरावात ‘राष्ट्रभक्ती’ला किंवा राष्ट्रप्रेमाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आले. तसे करताना भाजपने एक नवाच नातेसंबंध ठासून सांगितला आहे.’ आपल्या राज्यघटनेत इंडियाचा उल्लेख ‘भारत’ असाही करण्यात आलेला आहे - म्हणून भारताचा विजय असो - असे म्हणण्यास नकार देणे म्हणजे राज्यघटनेचा अवमान करणे होय. ‘भारतमाता की जय’ ही केवळ एक घोषणा नसून नागरिकांद्वारे केलेले आपल्या राज्यघटनेला सर्वश्रेष्ठ मानण्याचे कर्तव्यपालन आहे. याप्रकारे भाजपने एका देशभक्तीपर घोषणेला राज्यघटनेशी जोडण्याचा हा जो उपक्रम केला आहे, त्याचा संदर्भ तपासून पाहिला पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe