97632 06212 pwatsaru@yahoo.com

विद्यापीठीय आणीबाणीची केस


मिलिंद धुमाळे हैदराबाद विद्यापीठात डॉक्टर रोहित वेमुला यांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर देशात निर्माण झालेलं वातावरण हे एका भयावह अप्रिय घटिताचे संकेत आहेत. आत्महत्या हा शेवटचा टोकाचा मार्ग आहे. पीएच.डी. स्कॉलर डॉ. रोहित वेमुला यांनी चिठ्ठीत आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये असे म्हटले आहे आणि तेच वारंवार सांगितले जात असले तरी त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारे लोक यातून सुटू शकत नाहीत. घटनेची पार्श्वभूमी पाहता मुळात ही हत्या की आत्महत्या तसेच चिठ्ठी त्यांनी लिहिली की कुणी दुसर्याने, याचाही उलगडा झालेला नाही. त्याचबरोबर सुसाईड नोटमध्ये अनेक ठिकाणी खाडाखोड केलेली आढळली होती, त्याची फॉरेन्सिक तपासणी होणार होती त्या अहवालाचे काय झाले? आणि एकूणच सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती केंद्रसरकारच्या वतीने केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी नेमली होती त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe