97632 06212 pwatsaru@yahoo.com

पर्यावरण आणि ‘नीतिशास्त्रा’ची गरज


‘हवामान बदल’ आणि ‘पर्यावरण संकट’ यांच्याबद्दल मिळेल तिथं बोलणं ही ‘फॅशन’ झाली आहे. गेल्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये भारतातील ‘प्रबुद्ध नागरिक’, आपल्या ग्रहावर येऊ घातलेल्या पर्यावरणीय संकटाबद्दल ‘जागरूक’ झालेले आहेत. मानवानं पृथ्वीच्या जीवचक्रामध्ये मानवानं कितीही अडथळे निर्माण केले तरी पृथ्वीची भरपाई करण्याची क्षमता असते, अशा युक्तिवादांपासून ते (वृक्षारोपण, कचरा डब्यात टाकणं, इत्यादी) छोटीशी पावलं माणसांनी उचलली तरी त्याचा पृथ्वी वाचवण्याच्या कार्यात मोठा परिणाम होणार आहे, अशा मतांपर्यंत विविध मुद्दे या चर्चांमध्ये मांडले जातात. नवनिर्वाचित मोदी सरकारनं सुरू केलेल्या ‘गंगा बचाव’ प्रकल्पाचीही गत हीच आहे. या मोहिमेत नागरी समाजातील सक्रिय सदस्य उत्साहानं सहभागी होणार आहेत. आध्यात्मिक गुरूंनीही पर्यावरणात अचानक रस घ्यायला सुरुवात केली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe