97632 06212 pwatsaru@yahoo.com

भिवंडीच्या गोष्टी


असे म्हटले जाते की, जोवर देशातील अल्पसंख्य समाज वंचित असतो, तोवर कुठलाच देश हा विकसित अथवा प्रगतिपथावर आलेला नसतो. समन्यायी आर्थिक विकास हा अल्पसंख्यांच्या आर्थिक विकासाशी अंगभूतपणे जोडलेला असतो. भारतात मुस्लीम बहुसंख्य असलेले असे अनेक भाग आहेत, जमशेदपूर, मुरादपूर, मीरत, भिवंडी, मालेगाव आणि गुजरातेतील काही भाग ही त्यातली काही नावे आहेत. या शहरांनी काही विशिष्ट अशा व्यवसाय व उद्योगांमध्ये मोठी आगेकूच केल्याचे दिसते. दुर्दैवाची बाब अशी की याच भागांमध्ये अनेकदा झालेल्या जमातवादी दंग्यांनी स्थानिक लोकांचे व्यवसाय व उद्योग मोडकळीला आणलेले आहेत. दंगलींनंतर तेथील माणसं निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहू लागतात आणि त्या आर्थिक, सामाजिक बंदिस्त अवकाशातून बाहेर पडणे त्यांना कायमसाठी दुरापास्त होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe