97632 06212 pwatsaru@yahoo.com

सतनामच्या आत्महत्येचा अन्वयार्थ


28 एप्रिल 2016 रोजी फोनवरून कळले की सतनामने स्वतःच्या जीवनाचा अंत केलाय. ही अत्यंत दुःखद घटना आहे. सतत मनाला डाचणारी. अंतर्विरोधांनी भरलेल्या या जगात सुंदर जगाचे स्वप्न मांडणारा कथानायक शब्दांची साथ सोडून असा अकाली निघून गेला. त्याच्या अशा जाण्याने नव्या जगाचे स्वप्न पाहणार्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. अशा प्रसंगी सहजच आठवतात काही कार्यकर्त्यांच्या आत्महत्या. क्रांतिकारी कवी गोरख पांडे, साथी कानू सान्याल, लोकशाहीर विलास घोगरे, गुणी विद्यार्थी रोहित वेमुला, मुस्लीम सत्यशोधक संघटनेचे हुसेन जमादार अशी अनेक नावे. तसे पाहता आत्महत्या तर शेतकरी, युवक, विद्यार्थी असे सगळ्याच थरातील लोकं करतायत. अर्थात हे लोक व्यवस्थेच्या दुष्टचक्रात अडकून असे करतायत. परंतु जे आंदोलनाच्या, व्यवस्था परिवर्तनाच्या वाटेवर असतात ते व्यवस्थेला घाबरत नसतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe