97632 06212 pwatsaru@yahoo.com

पुनःपुन्हा गांधीखुनाची चिकित्सा


देशातील तरुणाईला ‘विकासाचे’ स्वप्न विकण्यात वर्तमान सरकार यशस्वी होताना दिसते आहे. याच काळात गांधीजींच्या नावे स्वच्छता अभियान चालविले आहे. सरकारला, त्यांच्या लोकशाहीविरोधी धोरणांना प्रश्न विचारणार्या एफटीआयआय, दिल्लीतील जेएनयू आणि हैदराबादची सेंट्रल युनिव्हर्सिटी या संस्थांच्या विद्यार्थ्यांना ‘देशद्रोही’ ठरवून ‘विकासाचा’ नारा जास्तच तीव्र होत आहे. ‘स्वच्छ भारत’ या कृतक अभियानात गांधीजींचा चष्मा बेधडक वापरला जात आहे. भगतसिंग आणि गांधीजी हे ‘आमचे’ आहेत असा आभास निर्माण केला जात आहे. याआधीही वाजपेयींच्या कार्यकाळात संघपरिवाराने गांधीजींना प्रातःस्मरणीय करत 2002 च्या गुजरात दंगली घडवून आणल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना ‘राजधर्माची’ आठवण करून दिली होती.