ईशान्य भारत हे संघाचे एक जबरी ऑब्सेशन आहे. कित्येक वर्षे हा भाग संघाला दादच देत नव्हता. तसे काही कारणही नव्हते म्हणा. निरनिराळ्या जमाती, टोळ्या आणि आदिवासी नागरिकांचा तो भाग तसा हिंदू भारतापासूनही फटकूनच राहायचा. त्यात ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी शतकांपूर्वीच तिथे जाऊन खूप सेवा करून लोकांना खेचून घेतलेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान आणि 1971 नंतरचा बांगलादेश थेट भारतातच फाळणीनंतर अडकल्यासारखा राहून गेला. अवतीभवती ईशान्य भारतीय प्रदेश आणि मध्ये हा परका भाग म्हणजे संघवाल्यांच्या दृष्टीने पोटात शत्रूचा शूळ कायमचाच!
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.