97632 06212 pwatsaru@yahoo.com

वर्तमान संदर्भात बाबासाहेबांची 'राष्ट्रकल्पना'


राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पना निखळपणे 'पाश्चिमात्य' आणि 'आधुनिक' आहेत. ते एक असे घटित आहे; जे युरोपातील प्रबोधनक्रांती, धर्मसुधारणांची चळवळ, वैज्ञानिक प्रगती, आधुनिक मूल्यप्रणाली, वसाहतवादाचा विस्तार, आधुनिक शिक्षण प्रणाली, धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था, मुद्रणतंत्र, युरोपातील सत्तास्पर्धा, राजकीय क्रांत्या, लोकशाही राजवटी आणि व्यापारी-औद्योगिक भांडवलशाहीच्या उदयाशी निगडित आहे. विशिष्ट स्थल-काळ-परिस्थितीतच राष्ट्रवाद नावाची गोष्ट जन्मास येऊ शकत होती. आधुनिकपूर्व काळात तिचे अस्तित्व नव्हते. भारतीय उपखंडाच्या बाबतीतही तीच गोष्ट खरी आहे. आधुनिकपूर्व काळात राष्ट्रवादाची कल्पना करणे ही गोष्ट अनैतिहासिक आणि कालविपर्यस्त आहे. वसाहतवाद जगभर फोफावत गेला; त्यासोबत आधुनिकता आणि राष्ट्रवादाचा विचारही जगभर जाऊन पोहचला. भारतीय उपखंडही त्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकला नाही. भारतात ब्रिटिश राज्य स्थापित झाल्यानंतरच भारतीयांमध्ये राष्ट्रजाणिवेच्या उदयाची शक्यता निर्माण झाली. तथापि आजही आपल्या देशात राष्ट्रवादाची संकल्पना बहुतकरून विपरित अर्थानेच उपयोगात आणली जाते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe