प्रकाशकाची खास सूचना पुस्तकातील आशयाची नांदी सांगून जाते. 22 डिसेंबर 1949 ला अयोध्येत काळोख्या रात्री घडलेली ही घटना या पुस्तकाने उजेडात आणली आहे. भारतीय संविधान अमलात येण्यापूर्वी जेमतेम एक महिना अगोदर हे सर्व घडले. पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जी. बी. पंत, लालबहादुर शास्त्री यांच्यासारख्या काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांमधील पत्रव्यवहार, उत्तर प्रदेश विधानसभेतील तत्कालीन कामकाजाचे काही संदर्भ वगळता लेखकद्वयाने व्यक्तिगत मुलाखती आणि गॅझेटियर्सवर अधिक भर दिला आहे. संबंधित व्यक्तींच्या ठळक फोटोप्लेटस पुस्तकाची शोभा वाढवितात.