97632 06212 pwatsaru@yahoo.com

संकरातून संस्कृतिसंवर्धन


अनेक जीवनप्रवाह सामावून घेणारी भारताची एकसंध प्रतिमा प्रदीर्घकाळ होती. ती अलीकडे विस्कटत चालली आहे. तिची जागा जात, धर्म, भाषा यांनी तडे गेलेली भारताची प्रतिमा घेते आहे. गतकाळ मात्र विविधता सामावून घेणार्या भारतीय कलांनी महत्ता प्राप्त केल्याचा संदेश देतो आहे. सर्व मानवांना समान मानणार्या समताधिष्ठित समाजमनास तो हळुवारपणे ताजेतवाने करतो आहे. चित्रकार, संगीतकार, नर्तक, साहित्यिक, कवी, विणकर कलावंत, वास्तुविशारद, विविध माध्यमांवर काम करणारे शिल्पकार, दागिने बनविणारे आणि खाद्यसंस्कृती जोपासणारे कलाकार अशा अनेक क्षेत्रांतील आणि शेकडो वर्षांतील कलावंतांच्या सर्जनशीलतेतून एकसंध परंपरांचा भारत हा चैतन्यशील देश विणला गेला आहे. त्यात विविध देश, विदेश, प्रदेश, धर्म-जात यांच्याशी निगडित परंपरा आणि त्यांचे रंग बेमालूमपणे उतरले आहेत. मुघल काळातील आणि शैलीतील चित्रांपैकी विशेष दखल घेतलेल्या पाच चित्रांचा या लेखात विचार केला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe