97632 06212 pwatsaru@yahoo.com

राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता 68 वर्षे उलटली असली, तरी राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादी कोणास म्हणावे हा चर्चा विषय व्हावा या बाबत कोणास आश्चर्य वाटले, तरी ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा देऊन सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षास राष्ट्रवाद हा विषय सतत सार्वजनिक चर्चेचा मुद्दा बनविण्याची गरज का वाटते हा तेवढाच कुतुहलाचा मुद्दा आहे. मात्र या हे दोन्ही मुद्दे परस्परांशी संबंधित असल्याने अनेकांना यापैकी कशाचेच फारसे आश्चर्य वाटणार नाही! एक तर आजवर ‘हिंदुत्व’ हा आपल्या राजकारणाचा केंद्रीय मुद्दा बनविण्याचा भाजपाने सातत्याने प्रयत्न केला आहे. पण वर्तमान परिस्थितीत अयोध्येत राममंदिर उभारणी करणे यासारखा प्रच्छन्न धार्मिक मुद्दा निवडणुका जिंकण्यास फारसा उपयोगी पडणार नाही अशी जाणीव झाल्याने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून निवडणुका जिंकल्यावरही कथित सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा अधिकृतपणे पक्ष आणि सरकार यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर न आणता तो इतर मार्गाने चर्चेत राखण्याचे पक्षाचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe