प्रत्येक व्यक्ती विशिष्ट अशा भोवतालात जगत असते. कुटुंब ते समाज असा विस्तारलेला भोवताल व्यक्तीच्या जगण्याला आकार देत असतो. कुटुंबाच्या पातळीवर बालपणापासून व्यक्तीची जडणघडण होते असे आपण मानतो. पण कुटुंब, त्यातील नातेसंबंध यांमुळे केवळ व्यक्तीच्या संवेदनस्वभावाची घडण होते असे नाही तर उपलब्ध भोवताल, त्याला असणारे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भही व्यक्तीच्या संवेदनस्वभावाला आणि विचारशक्तीला घडवीत असतात. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती यांच्या गेल्या दोन-अडीच दशकांतील वाढत्या बोलबाल्यानंतर तर ही बाब प्रकर्षाने जाणवतेय.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.