97632 06212 pwatsaru@yahoo.com

राष्ट्रपती राजवटीचा तिढा व वेढा


अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अनुसरून अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा काँग्रेसचे नाबाम तुकी सरकार स्थापन झाले. त्यानंतर 17 जुलै 2016 ला नेतृत्व बदल होऊन पेमा खांडु यांच्या नेतृत्वात मंत्रिपरिषदेची स्थापना झाली. याआधी असाच काहीसा प्रकार उत्तराखंडच्या बाबतीत घडून आला. उत्तराखंडमध्ये लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवून काँग्रेस पक्षाच्या हरिश रावत सरकारचा मार्ग मोकळा केला होता. राष्ट्रपती रावजटीसंबंधी यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिले असले तरी यावेळी दिलेला निर्णय अधिक महत्त्वाचा ठरतो. सर्वोच्च न्यायालयाने नाबाम रेबिया विरुद्ध उपाध्यक्ष या खटल्याचा निर्णय करताना अरुणाचलच्या राज्यपालाचा विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय रद्द ठरवून तिथे त्यापूर्वीची (15 डिसेंबर 2015 ला असलेली) स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe