97632 06212 pwatsaru@yahoo.com

सलोख्याचे प्रदेश - शोध सहिष्णू भारताचा


दिवसेंदिवस टोकाचा धार्मिक दुरभिमान (आक्रमक हिंदू बहुसंख्याकवाद आणि इस्लामी शुद्धीकरणाचा विखारी आग्रह) बळावला जात आहे, या दुरभिमानी अस्मितांच्या प्रश्नांवर राजकारणाची दिशा ठरवली जात आहे; याच पार्श्वभूमीवर त्याला छेद देणारे एक पुस्तक आपल्यासमोर येत आहे. भारतातील गढूळलेल्या धार्मिक वातावरणाने अस्वस्थ झालेल्या एका पत्रकाराने इथल्या सहिष्णू परंपरांचा, सरमिसळ असलेल्या इथल्या धार्मिकतेचा; उदारमतवादी, परस्परांना आपलेसे करत गेलेल्या इथल्या धार्मिक श्रद्धांचा धांडोळा म्हणजे हे पुस्तक आहे.