भारतातील शरियत कायद्याचा इतिहास हा गैरसमजाचा इतिहास आहे. मुस्लीम व्यक्तिगत कायद्याएवढा विपर्यस्त केला गेलेला आणि गैरसमजावर आधारलेला दुसरा कोणताही कायदा नाही. त्याची काही ऐतिहासिक कारणे आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताची सत्ता बळकावल्यानंतर वसाहतवादी रणनीतीचा भाग म्हणून भारतात अस्तित्वात असलेले सर्व कायदे रद्द करून, त्यांना सोयीचे कायदे करण्याची नीती अवलंबिली. परंतु हिंदू कायदे आणि मुस्लीम व्यक्तिगत कायदे बदलणे सोपे नव्हते. त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केले, तर त्यांचे वसाहतवादी हितसंबंध धोक्यात आले असते. म्हणून त्यांनी हस्तक्षेप न करण्याचे धोरण घोषित केले.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.