97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा मोर्चे : आंतरिक विग्रह की विग्रहाची एकजूट!


महाराष्ट्रात दीर्घकाळापासून सत्ता उपभोगत आलेला जातसमुदाय ही मराठा जातिसमुदायाची चिरपरिचित प्रतिमा आहे. गावपातळीपासून तर मंत्रालयापर्यंत आजवर मराठा जातवर्गाचेच वर्चस्व राहिले आहे. अनेकांना अप्रूप आहे की सरंजामशाहीची आणि जातवर्गवर्चस्वाची पृष्ठभूमी असतांनाही मराठा जातसमुदाय आपल्या मागण्या घेऊन सबंध महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला आहे. पण हेही तितकेच खरे आहे की मराठा जातसमुदायातील एक मोठा जनहिस्सा असा आहे जो सातत्याने सत्तापरिघाबाहेर राहिला आहे. तो सापेक्षत: दुर्भिक्षग्रस्त आहे. तो जनहिस्सा राहणीमानाचा दर्जा, साधन-संसाधनांवरची मालकी, तसेच शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीत जवळपास दलित-आदिवासी-भटकेविमुक्त-अन्य मागासवर्गीय-मागास मुसलमानांशी समकक्ष मानता येईल असा आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe