जोपर्यंत भीती व आभास या दोन गोष्टी देशाची नजरबंदी करत राहतील, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जात राहीलच. कधी साहित्यिकांकडून, कधी चित्रपटकलाकारांकडून, कधी शास्त्रज्ञांकडून, कधी विद्यार्थ्यांकडून आणि एके दिवशी संपूर्ण देशाकडून...
गेली साडेतीन दशके माझे वास्तव्य गुजरातमध्ये आहे. त्यातील पंधरा वर्षे, अलीकडे अलीकडे भारतभर गाजत असलेल्या गुजरात मॉडेलला जवळून अनुभवण्यात मी घालवली आहेत. त्या मॉडेलचे एक खास वैशिष्ट्य होते. स्वतःवरून स्तुतीची आरती ओवाळून घेत राहण्याचे.