97632 06212 pwatsaru@yahoo.com

आगामी जातसंघर्षाची नांदी


सहसा सामाजिक लढायांमध्ये न उतरणार्या उत्तर व पश्चिम भारतातल्या अनेक मध्यम जाती, विशेषतः जाट, पटेल आणि आता मराठा या आज आरक्षणाकरिता हिंसाचाराकडून मूकमोर्चापर्यंत अशा अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. त्यामुळे वारंवार उद्भवणारे प्रश्न निर्माण होतात ः सगळ्यांनाच आरक्षण का हवे आहे? काही समाज आज अत्यंत अस्वस्थ का झाले आहेत? आणि पुढे काय होणार आहे?