97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा महामोर्चाच्या मर्यादा


कोपर्डी बलात्कार आणि त्यानंतर हत्या या घटनेनंतर महाराष्ट्रातले राजकारण पार ढवळून निघाले आहे. एकानंतर एक विक्रमी मोर्चे रोज निघत आहेत. मुंबईतला मोर्चा कोटीचा टप्पा गाठणार अशी वंदता आहे. हे सर्व मोर्चे शांततामय-शिस्तबद्ध म्हणावेत असेच आहेत. मोर्चा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येणारी राडेबाजी कोठेच अगदी-कोठेच आढळत नाही. यातली सततची वाढत जाणारी उपस्थिती, शांतता अनेकांना आता भीतीदायक वाटू लागली आहे. या मोर्चाना नेतृत्व आहे आम जनतेचे - मोर्चाचे संयोजक आहे आम जनता. विविध राजकीय पक्ष-संघटना, राजकारण-समाजकारणातले धुरीण यांना जाणीवपूर्वक मोर्चापासून दूर ठेवले जात आहे. परंपरागत पुढारी अखेर अस्वस्थतेत का होईना या मोर्चात सामान्यजन म्हणून अखेरच्या रांगेत दाखल होत आहेत. जालना येथील मोर्चात महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, नांदेड येथील मोर्चात काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण सहभागी झाले होते. अजित पवार पुण्यातील मोर्चात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी तर प्रामुख्याने मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो त्या पक्षाचे गल्ली ते दिल्ली सगळेच पुढारी सामान्यजन म्हणून या मोर्चाशी संबंधित झाले आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe